आता सारखा रिचार्ज करायची गरज नाही! रिचार्ज न करता इतक्या दिवस सुरू राहणार तुमचं सिम कार्ड, जाणून घ्या…

दोन सिम कार्ड वापरणारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता दोन्ही सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) सिम कार्डशी संबंधित नवीन नियम लागू केला आहे. यामुळे तुमचा फायदा होणार आहे.
आता रिचार्ज संपल्यानंतरही 90 दिवस, जवळपास 3 महिने सिम कार्ड सुरू राहील. यूजर्सच्या सिम कार्डमध्ये प्रीपेड बॅलेन्स असल्यास 20 रुपये अतिरिक्त देऊन वैधता आणखीन 20 दिवसांसाठी वाढवता येईल. यामुळे याचा फायदा होणार आहे.
या नियमामुळे आता Jio, Airtel, Vi आणि BSNL यूजर्सला रिचार्ज न करताही जास्त दिवस सिम सुरू ठेवता येणार आहे. यापूर्वी कंपन्यांकडून काही दिवसातच सिम कार्ड बंद केले जात असे. मात्र, आता नवीन नियमाचा यूजर्सला फायदा होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिओ यूजर्सचे सिम कार्ड कोणत्याही रिचार्जशिवाय 90 दिवस सुरू राहील. त्यानंतर पुन्हा रिचार्ज करावे लागेल. अन्यथा तुमचा नंबर कायमचा बंद होईल. एअरटेल यूजर्स देखील कोणत्याही रिचार्जशिवाय 90 दिवस नंबर वापरू शकतील.
त्यानंतर रिचार्जसाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जाईल. यूजर्सच्या सिम कार्डमध्ये प्रीपेड बॅलेन्स असल्यास 20 रुपये अतिरिक्त देऊन वैधता आणखीन 20 दिवसांसाठी वाढवता येईल. यामुळे याचा फायदा होईल. अनेकदा दोन सिम असल्यास दोन्ही ठिकाणी रिचार्ज करावा लागत होता.
दरम्यान, 90 दिवसानंतर प्रीपेड बॅलेन्समधून 20 रुपये कापले जातील. व यूजर्सला अतिरिक्त 30 दिवसांची मुदत मिळेल. अशाप्रकारे, सिम कार्ड जवळपास 120 दिवस सुरू राहील. एवढेच नाही तर 120 दिवसांनंतरही सिम सुरू ठेवण्यासाठी यूजर्सला 15 दिवसांची मूदत दिली जाईल. यामुळे हा फायदेशीर निर्णय घेतला आहे.