केंद्र सरकारची नवी योजना महाराष्ट्रातून सुरू! आता शेतीच्या बांधावर शास्त्रज्ञ येणार, शेतकऱ्यांना होणार फायदा, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..


परभणी : केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातून होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. आता शेतीतील संशोधन कागदावर न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचावे, शेतीच्या वास्तवाशी थेट नाळ जुळावी, ही योजना सुरु केली असल्याचे सांगितले जात आहे.

यामध्ये आता या नव्या योजनेची अंमलबजावणी पुढील पंधरा-वीस दिवसांत होईल. प्रत्येक गावात ३ ते ४ कृषी अधिकारी/ शास्त्रज्ञांची टीम पाठवली जाईल. हे अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील, प्रश्नांची उत्तरे देतील आणि प्रत्यक्ष उपाय सुचवतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी कृषी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमातयाबाबत माहिती दिली आहे.

याबाबत ते म्हणाले, राज्यातील कृषी संस्थांतील अधिकारी, संशोधक, शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जातील. तेथे प्रत्यक्ष चर्चा करतील, समस्यांचा अभ्यास करतील आणि प्रात्यक्षिक संशोधन करतील. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना दोन मोठ्या अडचणी आहेत, अल्पभूधारकता: ७९% शेतकरी लहान जमिनीवर शेती करत असल्याने मोठी गुंतवणूक शक्य नाही.

शेतीला प्रयोग शाळेच्या चौकटीतून बाहेर काढून, बांधावर आणायचंय हेच खरं ‘फील्ड वर्क’अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी या नव्या उपक्रमाचे स्वरूप सांगितले आहे. या योजनेमुळे शेती संशोधनाचा पारंपरिक ‘लॅब टू लँड’चा फॉम्युर्ला उलटून ‘लँड टू लॅब’ होईल. शेतकऱ्यांच्या अडचणी थेट समजून घेऊन, त्यावर वैज्ञानिक उपाय शोधले जातील.

ही योजना हातात हात घालून काम करणारी मोहीम असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या योजनेमुळे राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था आणि शेती खात्याचा अधिक प्रभावी सहभाग वाढेल, असे संकेतही या कार्यक्रमातून मिळाले. यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार हे येणाऱ्या काळातच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!