राज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत, कारणही आले समोर..


मुंबई : राज्यात आगामी काळात नवीन रिक्षांना परवाना देणे थांबवले जाणार आहे. रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने यासाठी परिवहन विभागाने पावले उचलली असून, याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला पाठवला आहे. तसेच मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यास राज्यातील नवीन रिक्षांना परवाना देणे बंद होणार असल्याची माहिती आहे.

आता गौतमी पाटीलसाठी खासदार अमोल कोल्हे मैदानात, म्हणाले, दोन वेळचे जेवण

राज्यातील रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक रिक्षा संघटनांकडून याबाबत वारंवार मागणी केली जात होती. यानुसार परिवहन विभागाने पावले उचलत याबाबतचा प्रस्ताव तयार केला.

तोंडी तलाक देऊन दुसरे लग्न करणाऱ्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. मंत्रालयाकडून लवकरच यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यातील नवीन रिक्षांच्या परवान्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

उरुळीकांचन उपविभागात विजेचा प्रश्न नागरीकांच्या उठला मुळावर! महावितरणच्या एका प्रस्तावाला लोकप्रतिनिधींना नाही गांभीर्य!!

सर्वाधिक रिक्षा पुण्यात

राज्यात सर्वाधिक रिक्षा पुण्यात आहेत. राज्यभरात ८ लाख रिक्षा आहेत. त्यातील तब्बल एक लाख रिक्षा पुण्यात आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ हजार ५०० रिक्षा आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!