Mumbai Rain : राज्यात पावसाचे जोरदार आगमन, मुंबई तुफान पाऊस, वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद…

Mumbai Rain मुंबई : ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला आहे. तर, गोपाळकालाच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) समाधानकारक पाऊस (Rain) झाला आहे. गुरुवारपासून पावसाने चांगला जोर धरला आहे.
आज दुपारच्या सुमारास मुंबईच्या पश्चिम (Mumbai Rain) उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) सुरू असलेल्या पावसाचा( Mumbai Rain) जोर असाच कायम राहिला तर काही वेळातच सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होण्याची शक्यता आहे
दरम्यान ठाण्याकडून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा धावत आहेत. पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरगाव, मालाड, जोगेश्वरी, बोरिवली, दहिसर, कांदिवली, विलेपार्ले, वांद्रे, सांताक्रुज, परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झालेली आहे.
मुंबईचा (Mumbai) अंधेरीचा भाग हा सखल भाग असल्यामुळे सबवे खाली पाणी भरले असून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात विजांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत येत्या पाच दिवसांत पावसाची तीव्रता वाढणार आहे.