अखेर ती बातमी आलीच! येत्या ७२ तासांत मान्सून महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाकडून मोठी माहिती..


पुणे : बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. त्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली. सामान्यपणे मान्सून केरळमध्ये १ जूनपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी एक आठवडा उशिर झाला. असे असताना एक दिलासादायक बातमी आली आहे.

आता मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. पुढील ७२ तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. यामुळे चिंता वाढली होती. मान्सूनला विलंब झाल्याने यंदा त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

पेरण्याला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून चक्रिवादळाच्या प्रभावामुळे झाला आहे.

दरम्यान, पाऊस लांबल्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत. यामुळे आता पाऊस कधी पडेल आणि शेतीची कामे कधी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!