शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व अधिक ट्रान्सफॉर्मर उपलब्धीसाठी प्रयत्न व्हावेत ; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी…!


यवत : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी व विजेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी दूरगामी धोरण ठरविण्याची गरज असल्याचे मत आमदार अॅड. राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विजेच्या विविध समस्यांबाबत सुरु असलेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार अॅड. राहुल कुल म्हणाले कि, वीजबिला संदर्भात कधी तीन महिने, कधी सहा महिने तर कधी बारा महिन्यांनी बीज बिलांची मागणी होऊन शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर बंद केले जातात. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. सर्व पक्षांना विचारात घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी दूरगामी धोरण ठरविण्याची गरज असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी दौंड चे आमदार राहुल कुल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.

तसेच बिबट्या व इतर हिंस्र वन्यप्राण्यांचा देखील ग्रामीण भागात वावर वाढला असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना दिवसा वीज मिळावी अशी आग्रही मागणी आमदार अॅड. राहुल कुल केली, त्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज आहे. पुढील दोन तीन वर्षात ज्यादा निधी देण्याची गरज असून ट्रान्सफॉर्मर ना दुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते आहे त्याचा देखील शेतीवर दूरगामी परिणाम होत असून शेतकऱ्यांसाठी एक रोडमॅप तयार करण्याची गरज आहे. आज शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळविण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरी भागात दुसऱ्या दिवशी वीज कनेक्शन दिले जाते परंतु शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे वीज जोडण्या प्रलंबित राहतात त्यासाठी सर्वांना विचारात घेऊन शेतकऱ्यांसाठी एक दुरगामी धोरण ठरविण्याची मागणी या वेळी आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!