Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या आड येणाऱ्यांची लवकरच नावे सांगणार, त्यांना गुलाल लागू देणार नाही – मनोज जरांगे पाटील


Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. या पार्शभूमीवर मनोज जरांगे यांची शुक्रवारी परभणी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या आड येईल त्याला आयुष्यभर गुलाल लागू द्यायचा नाही, वेळ येईल तेव्हा आरक्षणाच्या मार्गात येणाऱ्यांची नावंही सांगणार असं म्हणत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मार्गात येणाऱ्यावर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगेंच्या परभणीतील सभेला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. जरांगेंचा पाचव्या टप्प्यातील दौरा सुरु आहे. परभणीच्या सेलूमध्ये शुक्रवारी मनोज जरांगेंची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणात अडथळा आणण्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. Manoj Jarange Patil

करोडोंच्या संख्येने मराठे एकत्र आले, ही लाट आता साधीसुधी नाही. तुमच्या नोटीसीला घाबरून ही लाट मागे फिरणार नाही. धमक्यांना घाबरत नाही, आम्ही धमक्या देत नसतो. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. लोकशाहीप्रमाणे लढा सुरु आहे. ही सभा नाही, मराठ्यांची वेदना आहे, मराठ्यांनी ८० टक्के लढाई जिंकली आहे, अअसेही जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठ्यांनी मैदानात या. आता हटायचे नाही, तुमच्या जीवावर मी लढतोय. हे आरक्षण कसे देत नाही ते बघतो, नोटिसीला घाबरत नाही, आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही. मराठ्यांनी सावध व्हावे, एकजूट राहा, अशी संधी पुन्हा येणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!