Manoj Jarange Patil : ..तर सरकारचे हाल होतील! आता मनोज जरांगे पाटील हट्टाला पेटले, थेट सरकारलाच दिला इशारा


Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. तर, काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.

आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, आमच्या हक्काचं आरक्षण आहे. तेच आम्ही मागतोय. ओबीसी मात्र त्यांना आरक्षण असून अजून जास्त आरक्षण मागत आहेत. येवल्याच्या भुजबळांना सर्वच ओरबाडून घ्यायचं आहे.

आमचं तसं नाही. आमच्या नोंदी आहेत. त्यामुळे आरक्षण आमच्या हक्काचे आहे. सरकार तसं करणार नाही. पण सरकारने तसं केलं तर सरकारलाच महागात पडेल. सरकारने पूर्वी सारखच केलं तर पुन्हा सरकारचे हाल होतील. आमचा नाईलाज आहे, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट सरकारलाच इशारा दिला आहे. आमची एकही नोंद खोटी नाही. तरीही जाणूनबुजून कारवाई केली जात आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत.

त्या खोट्या ठरवल्या जाणार आहेत. सरकार भुजबळांच्या बाजूने बोलून आमच्यावर कारवाई करत आहे. ओलं तुमचं आहे, तसं सुकं तुमचं आहे. सरकार तुमचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!