Manoj Jarange Patil : भुजबळांना शांत करा नाहीतर…! जरांगे पाटील आता थेटच बोलले….

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे आपल्या प्रत्येक सभेतून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना पाहायला मिळत आहे. तसेच मागच्या काही दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षणानंतरच ओबीसी समाज देखील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मागच्या काही दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. मराठा आरक्षणानंतरच ओबीसी समाज देखील आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
येवल्यामध्ये गाव बंदीचे होर्डिंग फाडण्यात आल्याचे आरोप करत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ यांना शांत करा नाहीतर मराठा शांत करायला सक्षम असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “मराठ्यांना आरक्षण म्हंटले की विरोध चालू झाला. अनेकजण मराठा खेकड्यासारखा असल्याचे म्हणायचे, पण आता करोडो बांधव एकत्र आले आहे. ही लाट आता थांबणार नाही. तो म्हातारा कसंही बरळत आहे. आपण कोणाचं नाव घेत नाही, त्याची लायकी देखील नाही की आपण त्याचं नाव घ्यावेत.
सर्वांचं खातो आणि म्हणतो मी खात नाही. येवल्यात आमचे बोर्ड फाडले असे कळते, अजित दादाला सांगतो त्याला समजावून सांगा. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, नाहीतर आमच्या नावाने खडे फोडू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही सांगतो.
कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आमचे बोर्ड फाडले असतील, तर मग आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. तुम्हाला हे जड जाईल आधीच सांगतो. चिल्लर चाळे करू नको म्हणून त्याला सांगत आहे.
सरकारला देखील हे जड जाऊ शकते, गंभीर्याने घ्या, सरकारला त्रास होईल. येवल्यात मराठा बांधवांचे गावबंदीचे बोर्ड फाडल्यावरून जरांगे यांनी सरकारला ईशारा दिला आहे.