Manoj Jarange Patil : भुजबळांना आवरा ते महाराष्ट्र पेटवतायेत, मनोज जरांगे पाटील यांचा नवीन आरोप..

Manoj Jarange Patil : मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. मंत्री छगन भुजबळ हेच दंगली घडवणार आहेत. त्यांना आवरा, समाजाचा प्रश्नाचे यांना गांभीर्य नाही का? असा सवाल जरांगे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ आहेत. ते जातीयवाद करत असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभं करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केले आहे. असे जरांगे पाटील म्हणाले आहे.
जरांगे पाटील म्हणाले, राज्यात मराठा ओबीसी हा वाद कधीच होणार नाही. छगन भुजबळ हे महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. छगन भुजबळांना सरकारनं बळ दिलं आहे. त्यांना सरकामध्ये घेऊन मंत्रीपद दिलं आहे. त्या पदाचा गैरवापर करत आहेत.
ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभं करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मी माझा समाज एका बाजुला आहे. सगळे ओबीसीचे नेते एका बाजुला आहे. नेते राजकीय स्वार्थासाठी काम करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
अजित पवार हे सत्तेत आहेत. त्यांचे लोक छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे मराठ्यांना लक्ष्य करत आहेत. आता तुम्ही भोगा असेही जरांगे म्हणाले. आम्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांना बघायला आलो नाही असेही जरांगे पाटील म्हणाले. Manoj Jarange Patil
हे फक्त वेळ मारुन नेत असल्याचे जरांगे म्हणाले. आम्ही कोणाच्या फायद्यासाठी कामच करत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा लक्षात घेऊन राजकारण होत असेल तर चूक आहे. आम्ही आमची शक्ती दाखवतो असंही जरांगे पाटील म्हणाले.