Maharashtra Politics : तटकरे यांनी फोडले शरद पवार यांचे घर? शरद पवार गटाच्या आरोपाला आता अजित पवार गटाने दिले प्रतिउत्तर ..


Maharashtra Politics : शरद पवारांचे घर सुनील तटकरे यांनी फोडले, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केला. सुनील तटकरे हे कायम अजित पवारांच्या कानात सांगायचे काम करतात.

सुनील तटकरे यांनी शरद पवारांचे घर फोडले, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याला अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा निषेध करतो. शरद पवारांना आव्हाडांनी विचारावे की, २०१४ चा निकाल येण्याआधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यास कोणी सांगितला? शरद पवारांना कायम खोटेनाटे सांगण्याचे काम आव्हाडांनी केले.

भिवंडीची जागा हट्टापायी घेतली. आता त्या जागेवर उमेदवार कसा निवडून येईल याची काळजी आव्हाड यांनी करावी,” असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.  Maharashtra Politics

पुढे ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडला, आरोपही अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे. आनंद परांजपे यांच्या आरोपावर आता जितेंद्र आव्हाड कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!