Maharashtra Politics : जागावाटपाचा वाद पेटला! ठाकरे गटाकडून होणार बंडखोरी? महत्वाची माहिती आली समोर…


Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.

त्यामध्ये आता छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि इतरांनी मिळून तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. त्यामुळे मतदारसंघात तिहेरी निवडणूक पाहायला मिळू शकते. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे.

अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेला पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये चांगलाच संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत असून हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी केली आहे. Maharashtra Politics

दरम्यान, पारनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे आता खासदार निलेश लंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमदारकीला हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सोडावा.

अन्यथा शिवसैनिक अन्याय सहन करणारे नसतात, वेळप्रसंगी बंडखोरी होईल, असा थेट इशाराही संदेश कार्ले यांनी दिला आहे. तसेच या मतदारसंघात निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके इच्छुक आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमक्या कुणाच्या वाटेला येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!