Maharashtra : मतदारांना बाहेरून आणण्यासाठी ‘फोन पे’ करा!! शिंदेसेनेच्या आमदाराच्या कार्यकर्त्यांना सूचना…

Maharashtra : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्त्यांची आता जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्ष आता प्रचाराला लागले आहेत. अशात शिंदे गटाच्या एका आमदाराचं एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे.
दरम्यान, यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना आणण्यासाठी गाड्या करा, फोन पे करा..असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. त्यांचे हे वक्तव्य आता चर्चेत आले आहे.
संतोष बांगर यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केल्याने, संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. यावर, निवडणूक आयोग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष राहील. Maharashtra
यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधाने…
आमदार बांगर यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. अशात त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे. दरम्यान, उमेदवारी घोषित होण्याअगोदरच आमदार संतोष बागर यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. येत्या २४ तारखेला ते कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.