Lok Sabha Election : मोठी बातमी! आता शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंचीही घोषणा, उमेदवार जाहीर…

Lok Sabha Election : केंद्रीय निवडणूक आयोग कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. सर्व पक्ष निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे, कारण दोन मोठे पक्ष फुटले आहेत.
तसेच बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची शरद पवारांकडून घोषणा करण्यात आली असतानाच, महाविकास आघाडीतील आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार असणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. जुहू येथील कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. Lok Sabha Election
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा सुरु होती.
अशातच आता स्वतः उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील आपला उमेदवार घोषित करून टाकला आहे. ‘अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार आहे. त्यांना जिंकून द्यायचा आहे,’ असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.