कारखाना जिरवाजिरवीचे राजकारण करुन बंद पाडणारे नेते एकत्र आले आहेत, त्यांनी १३ कारखाना बंद पडल्यावर काय केले, सव्वाशे कोटी देणाऱ्यांनी फक्त सहानुभूती मिळवली – प्रकाश जगताप यांची घाणाघाती टिकास्त्र..

उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याचा १९९६ पासून कोणी कारभार हाकला,सत्ता मिळविण्यासाठी कोणी कशाप्रकारे हातमिळवणी केली, जिरवाजिरवीत कोण पुढे होते, आता तीच मंडळी कोणत्या हेतूने एकत्र आली आहेत, संस्थेचे वाटोळे ज्यांनी केले तेच आज एकत्र आहेत, मग हा एकत्रपणा गेली १३ वर्षे कारखाना बंद पडल्यानंतर का दिसला नाही, जे कारखाना सुरू होण्यासाठी सव्वाशे कोटी देऊ म्हणाले त्यांनी निवडणूक लावण्यापर्यंत वाट का पाहिली, सत्तेसाठी एकत्र आलेल्या या सर्वांना उद्देश संस्थेचा हिताचा दिसला नाही असा थेट हल्लाबोल आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख हवेली बाजार समितीचे माजी सभापती व संचालक प्रकाश जगताप यांनी केला आहे.
थेऊर( ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा संचालक मंडळाच्या निवडणुकीत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेल च्या प्रचाराचा नारळ हा चिंतामणी चरणी वाहून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जाहीर सभेत पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांनी विरोध पॅनेलवर जोरदार नाव घेऊन हल्ला चढवून कारखाना भविष्यात सुरू करुन दाखवू म्हणून सभेला अश्वस्थ केले. यावेळी सभेस पुणे जिल्हा बॅकेचे संचालक विकास दांगट, माजी आमदार संभाजी कुंजीर, महाराष्ट्र राज्य साखर कामगार मंडळाचे संचालक तात्यासाहेब काळे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, शंकर हरपळे, शिवराज घुले, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर , माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, संजय सातव, हवेली पंचायत समितीचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी, हिरामण काकडे, संदिप गोते, आण्णासाहेब काळभोर, लक्ष्मण केसकर,संतोष कुंजीर , चित्तरंजन गायकवाड, जितेंद्र बडेकर, आण्णा महाडीक , पॅनेलचे उमेदवार व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
प्रकाश जगताप म्हणाले, कारखाना निवडणूक न्यायालयामुळे लागली आहे. परंतु त्यानंतर काही चित्र निर्माण झाले आहे. हे सभासदांची दिशाफूल करणारे आहे.कारण ज्यांना या निवडणूकीत एकत्र यायचे होते. त्यांच्यासाठी फक्त निवडणूक बिनविरोधचा प्रस्ताव विरोधी पॅनेल प्रमुखांनी मांडला. परंतु हा प्रस्ताव खऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्यांसाठी मात्र नव्हता, ज्यांनी १९९६ पासून जिरवाजिरवी केली. जे अनेक वर्षे विरोधात लढले, ते नेते आज त्यांच्यासाठी जागा माघत आहे. तरीही संस्थेचे हित पाहून आम्ही ज्यांनी सव्वाशे कोटी कारखाना सुरू करण्यासाठी देऊ म्हणालेत्यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केला नाही, एकत्र येण्यासाठी योग्य प्रस्ताव दिला नाही. पॅनेल सुरुवातीला जाहीर केला मग त्यांनी निवडणूक बिनविरोध प्रस्ताव हा केवळ दिशाभूल करण्यासाठी केला असा आरोप प्रकाश जगताप यांनी नाव घेऊन केला आहे.
प्रशांत काळभोर म्हणाले, दत्तोबा कांचन यांच्यानंतरची कारखान्याची धुरा कोणी संभाळली, अडीच कोटीचे कर्ज ३८ कोणी केले, विस्तारवाढीची गरज नसताना कोणी विस्तारवाढ केला. आज जे कारखाना चालू करु म्हणताय़ंत त्यांनी त्यावेळी एकमेकांची जिरवण्यात कारखान्याची १लाख पोती साखरविक्रीची परवानगी घेऊन ५ लाख पोती कवडीमोल भावात विकून कारखाना कसा खड्यात घातला. व तेच नेते आपले अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांचा हेतू सभासद जाणून आहेत असा आरोप प्रशांत काळभोर यांनी केला आहे.
सभेत शंकरनाना हरपळे, तात्यासाहेब काळे, संभाजी कुंजीर, आण्णासाहेब काळभोर, हिरामण काकडे यांनी आपले विचार व्यक्त केले. या दरम्यान हिरामण काकडेंनी आपली उमेदवारी माघारी घेऊन आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.