लाडकी बहीण योजनेचे पैसे झाले कायमचे बंद!! eKYC ठरली गेमचेंजर, सगळी माहिती आली समोर..

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या प्रक्रियेची मदत वाढवण्यात आल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला.
तसेच लाडकी बहीण योजनेत महिलांची ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ई-केवायसीमध्ये ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांची माहिती मिळणार आहे आणि त्यांचे लाभ बंद केले जाणार आहेत.

आता वार्षिक उत्पन्न जर २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना फटका बसणार आहे. या महिलांची माहिती ई-केवायसीमध्ये उघडकीस येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, या मुदतीपूर्वी सर्व महिलांना ई-केवायसी करायची आहे. दरम्यान, या ई-केवायसीत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसीमधून महिलांची सर्व माहिती मिळणार आहे. महिलांसोबत त्यांच्या पती किंवा वडिलांचीही ई-केवायसी होणार आहे. त्यामुळे या महिलांचे वार्षिक उत्पन्न, वय याबाबत सर्व माहिती मिळणार आहे. याच माहितीच्या आधारे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी योजनेत लाभ घेतला आहे. या योजनेत निकषांबाहेर जाऊन देखील महिलांनी लाभ घेतला होता. त्यानंतर महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. यामधून ५२ लाख महिला अपात्र असल्याची माहिती समोर आली. त्यांचे लाभ बंद करण्यात आले.
आता ई-केवायसीनंतर लाडक्या बहिणींची सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार आहे. प्राप्तिकर विभाग या माहितीची पडताळणी करेल. यामध्ये ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचे लाभार्थी दोन कोटीपेक्षा अधिक महिला आहेत. त्यांना शासनाकडून प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचा निधी दिला जातो.