जाण्याची वेळ झाली…!! अभिनेते अमिताभ बच्चन यांची ट्विटमुळे चाहते चिंतेत, नेमकं घडलं काय?

मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन हे सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या १६ व्या सीझनमुळे चर्चेत आहेत. हा दिग्गज अभिनेता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

काल रात्री त्यांनी एक पोस्ट शेअर केली ज्यामुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले, ‘जाण्याची वेळ झाली आहे ’ काही लोक अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टला शुभ रात्री म्हणण्याचा एक मार्ग मानत आहेत. मात्र याचा अर्थ अनेकांनी वेगवेगळा घेतला आहे.
तसेच काहींनी याचा अर्थ तो किती वक्तशीर आहे हे जाणून, ही फक्त रात्रीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट मानली जाऊ शकते. पण बरेच लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट शेअर करताच सोशल मीडिया वापरकर्ते विचारू लागले की एवढी घाई काय आहे. अनेक चाहत्यांना याबाबत अनेक चिंतेत टाकणारे प्रश्न पडले आहेत. यामुळे याची मोठी चर्चा रंगू लागली आहे.

यावर एका चाहत्याने लिहिले, साहेब, इतक्या लवकर का? त्यापैकी एकाने विचारले कुठे? अशाप्रकारे अनेक चाहते त्याला मजेदार प्रश्न देखील विचारत आहेत. सध्या यामुळे सोशल मीडियावरील वापरकर्त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३४ वाजता त्यांनी केलेले ट्विट आता चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन हे ९० च्या दशकातील अभिनेते असले तरी ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेक विषयांवर ते आपलं मत मांडतात. त्यांचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्यांचे चित्रपट म्हणजे एक पर्वणीच असते. अजूनही त्यांच्या चित्रपटांना मोठी गर्दी होत असते.