राज्यातील काराग्रह घोटाळ्यांची चौकशी करा! राजू शेट्टी यांनी पुराव्याशीत सगळंच केलं उघड, अनेक ठिकाणी करोडोंचा घोटाळा….


पुणे : राज्यातील काराग्रह घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते म्हणाले, झालेल्या घोटाळ्यांची सर्व माहिती मी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री , मुख्य सचिव, गृह सचिव यांना देवून जवळपास तीन महिने झाले. याबाबत राज्य सरकारकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

याचाच एक भाग म्हणून काराग्रहात कशा पध्दतीने घोटाळे झाले आहेत हे माध्यमांनी दाखविले आहे. त्यातील एक प्रकार म्हणजे येरवडा मध्यवर्ती काराग्रहात २ कोटी ५५ लाख ८९ हजार ४४० रूपयाची साहित्य खरेदी करण्यात आली. सदरची ॲार्डर देत असताना पुणे मध्यवर्ती काराग्रहाच्या अधिक्षक यांनी पुरवठा करण्याबाबतचे आदेशान्वये साहित्य पुरवठा करण्याचे पत्र दिले.

त्यानंतर सदरचे पत्र काराग्रह लिपीकांनी स्विकारले. सदर पत्रामध्ये काराग्रहातील कैद्यांसाठी गहू, चहा, तांदूळ, तुरडाळ, चनाडाळ, गुळ, साखर, वनस्पती तेल, शेंगदाणे यासह मसाल्याचे पदार्थ व अन्य वस्तु पुरवठा करण्याचे २ कोटी ५५ लाख ८९ हजार ४४० ची ॲार्डर होती. असे असताना मात्र पुरवठा करणारा ठेकेदारास काराग्रह अधिक्षक येरवडा काराग्रह यांनी सदरची खरेदी करत असताना पुरवठा करणाऱ्या ठेकेदारास दिनांक साहित्य पुरवठा करण्याची ॲार्डर दिली.

याचाच अर्थ असा आहे की पुरवठा करणारे ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमताने पुरवठा आदेश पारित होण्याआधीच व निवीदा प्रसिद्ध होण्याआधीच २ कोटी ५५ लाख ८९ हजार ४४० रूपयाची खरेदी ॲार्डर देवून साहित्य खरेदी करण्यात आले आहे. सदरच्या खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची त्यावेळेस बाजारात असणारी किंमत व प्रत्यक्षात खरेदी करण्यात आलेली किंमत यामध्ये मोठी तफावत आहे.

सदर झालेला पत्रव्यवहार, खरेदी ॲार्डर माहितीस्तव टाकत आहे. खरच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मिशीला खरकट लागले नसेल तर काराग्रह घोटाळ्याची सखोल चौकशी करावी हिच अपेक्षा, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!