आचारसंहिता काळात महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, निवडणूक प्रक्रियेत अडथळा येणार? कारवाईची मागणी…


पुणे : राज्यात सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या नावाखाली बेमुदत काम बंद आंदोलन करत असल्याने निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, याबाबत पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार देविदास झेंडेपाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी हे मतदार यादी तयार करणे, निवडणूक प्रमाणपत्रे देणे, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तसेच संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे कणा आहेत.

अशा अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवणे म्हणजे थेट निवडणूक प्रक्रियेवर आघात करण्यासारखे आहे. आदर्श आचारसंहिता लागू असताना असे आंदोलन करणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951, आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

       

त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ हस्तक्षेप करून महसूल विभागाचे कामकाज सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, तसेच भविष्यात निवडणूक काळात अशा प्रकारची आंदोलने होऊ नयेत यासाठी कठोर मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तातडीने कायदेशीर कारवाई आदेश..

निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही व्यवस्थेचा गाभा असून ती बाधित होणे हा गंभीर अपराध असल्याचे नमूद करत, या प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा तुषार झेंडेपाटील यांनी व्यक्त केली आहे. तुषार देविदास झेंडेपाटील हे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, पुणेचे सदस्य तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!