उरुळीकांचन उपविभागात विजेचा प्रश्न नागरीकांच्या उठला मुळावर! महावितरणच्या एका प्रस्तावाला लोकप्रतिनिधींना नाही गांभीर्य!!

जयदीप जाधव
उरुळी कांचन : पूर्व हवेली तालुक्यातील महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागात वीजेची वाढती मागणी तसेच स्थिर दाबाचा वीज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने गेल्या ५वर्षापासून सातत्याने या ठिकाणी अतिरिक्त वीज उपकेंद्र निर्माण करण्याची मागणी होत आहे. परंतु जागेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने वीज उपकेंद्राचा प्रश्न जैसे थे आहे. तर दुसरीकडे या भागात विजेचा अतिरिक्त भार निर्माण होत असल्याने वीजेचा खंडीतपणा वाढला आहे.
या समस्येला दूर करण्यासाठी महावितरणकडे पुरंदरउपसा केंद्रातून वीज पुरवठा मिळण्यासाठी कृष्णाखोरे विकास महामंडळाची मान्यतेची गरज असताना, मात्र पुणे महावितरणच्या अधिक्षक अभियंता यांनी कृष्णा खोरे महामंडळाला प्रस्ताव पाठवूनही हा फक्त तत्सम लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने पडुन राहित असल्याने पूर्व हवेलीत वीजेच्या समस्या सोडविण्यासाठीची उदासिनता जाणवत आहे.
पुणे शहराचा विस्ताराचा एक भाग होत असलेल्या उरुळी कांचन उपविभागात वीजेची मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.या ठिकाणी अनेक गृहप्रकल्प,व्यावसायिक वीज मागणी तसेच औद्योगिक वापर वाढल्याने वीजेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या भागात शेतीसिंचनासाठी वीज पुरवठा अखंडित असल्याने वीजेचा मोठा भार या ठिकाणी आहे.
पुणे हादरले! भाजी कापण्याच्या चाकूने सपासप वार; प्रेयसीकडून प्रियकराची निर्घृण हत्या
मात्र या संपूर्ण उरुळी कांचन उपविभागात २३ गावांतील वीज पुरवठा प्रश्न सोडविण्यात महावितरणला अपयश आल्याने या ठिकाणी दिवसेंदिवस येथील वीजेचा खंडीतपणा बिकट होऊ लागला आहे. या ठिकाणी वीजेच्या खंडीतपणाने शेतकरी , व्यवसायिक अत्यंत हैराण झाले आहेत.
दोन हजारांची नोट चलनात आणणे व परत घेण्याचा निर्णय मुर्खपणाचा; पी. चिदंबरम यांची सरकारवर टीका
उरुळी कांचन उपविभागात लोणी काळभोर,कदमवाकवस्ती थेऊर, कुंजीरवाडी,उरुळीकांचन ही प्रामुख्याने गावे नागरीकरणा ने झपाट्याने वाढत असताना वीजेच्या नियमित मागणीचा प्रश्न या ठिकाणी सुटत नसल्याने वीजेचा खंडीतपणा वाढला आहे.या भागात वीजेच्या अतिरिक्त मागणी वपर्यायी वीज साठवणूकीला पर्याय नसल्याने वीज वाहिन्या,सब स्टेशनमध्ये यांत्रिक बिघाडा ने पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे. भर उन्हाळ्यात तर वीजेचा खंडीतपणाने नागरीक अक्षरशः हौराण झाले आहे.
धक्कादायक! सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर, पुण्यातील घटना
मात्र महावितरणला यवत मार्गे उरुळीकांचन, कोरेगावमूळ व थेऊर मार्गे वळती वीज पुरवठा सातत्य होत नसल्याने वीजेची परिस्थिती बेभरवशाची झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी महावितरणने या भागात २२केव्ही क्षमतेच्या उपकेंद्र उभे करण्याचा प्रयत्नाला यश मिळत नसल्याने या ठिकाणी पुरंदर उपसा योजनेतून वीज पुरवठ्यासाठी शिंदवणेतून कृष्णा खोरे महामंडळाकडून वीजेचा पुरवठा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र तो प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. या प्रस्तावाला पाठपुरावा करण्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार, खासदार हे प प्रयत्न करत नसल्याने या भागातील वीजेचा प्रश्न कधी सुटणार म्हणून जनता हतबल झाली आहे.
‘उरुळीकांचन कांचन उपविभागात अतिरिक्त वीजेची मागणी आहे, तर पुरवठा खंडित होतोय ही बाब खरी आहे. या ठिकाणी महावितरणने अनेक ग्रामपंचायतींना उपकेंद्रासाठी जागेची मागणी केली आहे. परंतु ती मिळत नाही. त्यासाठी आम्ही पुरंदर उपसा योजनेतून अतिरिक्त वीजेचा पुरवठा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाला प्रस्ताव दिला आहे. परंतु परवानगी मिळाली नसल्याने काम सुरू करता आले नाही. लवकरात या ठिकाणाहून परवानगी मिळाल्यास वीजेचा खंडीतपणा होण्याचा प्रश्न सुटेल’
– माणिक राठोड
कार्यकारी अभियंता , मुळशी विभाग.