ओबीसी नेत्याची महत्त्वाची बैठक ; भुजबळांकडून जरांगे पाटलांना घाम फोडणारी मागणी


पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे.त्यानंतर मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने आले आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली, या बैठकीत बोलताना भुजबळ यांनी मोठी मागणी केली आहे. या मागणीमुळे जरांगें पाटलांना मोठा धक्का बसला आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

विधी व न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काढाला? ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योतीसाठी सरकारी निधी लवकर का उपलब्ध होत नाही? असा सवाल भुजबळांनी या बैठकीमध्ये उपस्थित केला आहे. दरम्यान या बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांकडून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे २ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेला शासन निर्णय ओबीसीला धक्का लावणारा आहे , हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे, तर दुसरी मागणी करण्यात आली आहे, ती म्हणजे २०१४ पासून राज्यात दिले गेलेले जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र यांची श्वेतपत्रिका काढावी.

       

या बैठकीत मंत्री पंकजा मुंडे याची देखील उपस्थिती होती, कुणबी दाखले जे मराठा समाजाला दिले जात आहेत, त्यासंदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा, अशी मागणी या बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!