महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्यातर भाजप-शिंदे गटाला फक्त 14 जागा…!

नवी दिल्ली : भाजप चे ‘ ऑपरेशन लोटस ‘ आणि महाराष्ट्रात भाजप-शिंदे गट आणि महविकास आघाडी यांच्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष, यामुळे मतदार लोकसभा निवडणुकीत कोणाला पसंती देतील, हा चर्चेचा विषय बनला आहे. याविषयी ‘इंडिया टुडे-सी व्होटर’ने एक सर्व्हेक्षण जारी केले आहे. त्यातील आकडेवारी शिंदे गटाची काळजी वाढवणारी आहे.
या सर्व्हेनुसार, देशात आज लोकसभेची निवडणूक झाली तर केंद्रातील सत्ताधारी एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल. आकडेवारीनुसार यावेळी काँग्रेसच्या कामगिरीत किंचीत सुधारणा झाली होईल. काँग्रेसला 100 च्या आत जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण त्याचा त्या पक्षाला कोणताही फायदा होताना दिसून येत नाही.
दरम्यान सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला केवळ 14 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप युतीला सर्वाधिक 42 जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता सर्व्हरमध्ये वर्तवण्यात आली आहे.
तसेच या सर्वेनुसार, लोकसभेची आज निवडणूक झाली तर NDAला अनेक राज्यांत फायदा होण्याची शक्यता आहे.
या सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना 39 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के नागरिकांनी पसंती दिली. ते या प्रकरणी दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.
त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिसऱ्या (7 टक्के पसंती), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन चौथ्या (5 टक्के पसंती), ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पाचव्या (3 टक्के पसंती), आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा 6व्या (3 टक्के पसंती), मध्य प्रदेशचे सीएम शिवराज सिंह चौहान 7व्या (2.4 टक्के पसंती) क्रमांकावर आहेत.
या क्रमवारीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना केवळ 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे.