मीही सहकारमंत्री होतो, कोट्यवधी रुपयांचे दंड माफ केलेत, घाबरायचं नाही; 22 कोटींचा दंड झाल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचे वक्तव्य

इंदापूर : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेले कर्मयोगी व निरा भीमा कारखान्यास विना परवाना गाळप केल्याबद्दल 22 कोटी दंडाची नोटीस आली त्याच्या बातम्या आल्या. यामुळे खळबळ उडाली होती.
याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, या संदर्भातील दंडाच्या नोटिसा हा कामकाजाचा भाग असतो. अशा दंडाची वसुली होत नाही. यासंदर्भात दोन्ही कारखान्यांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले आहे.
मी सहकारमंत्री असताना प्रत्येक वर्षी असे कोट्यावधी रुपयांचे दंड रद्द केले आहेत. त्यामुळे नोटीस च्या बाबतीत घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी विरोधकांकडून केले जात असलेल्या राजकारणावर हल्ला केला.
एखादी संस्था स्थापन करून ती यशस्वीपणे चालविण्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट व त्रास सहन करून, वेळ द्यावा लागतो, तसेच अनेक वेळा इतरांचा वाईटपणा घ्यावा लागतो, हे आंम्ही शेतकऱ्यांसाठी केले आहे व आगामी काळातही करीत राहू.
विरोधकांनी मात्र तालुक्यात सहकार क्षेत्रात एकही संस्था उभी करून चालविलेली नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.