राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येणार, उष्णतेमुळे बळींची संख्या वाढण्याची शक्यता…!

पुणे : या आठवड्यापासून देशातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू होईल. ६ ते ९ मेदरम्यान अवघ्या ७२ तासांत राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांचे तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
सध्या उत्तर-मध्यसह देशातील बहुतांश भागात अचानक उष्मा वाढला आहे, तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. एक विचित्र हवामान स्थिती विकसित झाली आहे.
११ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोलकात्यात पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी १ मे रोजी देशाचे सरासरी कमाल तापमान ४३.५ अंश सेल्सिअस होते, ते यावर्षी २८.७ राहिले. ५ मे २०२२ रोजी ते ३९.१ सेल्सिअस होते, जे ५ मे रोजी ३२.१ से. होते.
Views:
[jp_post_view]