रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता दरमहा 1000 रुपये मिळणार! जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया..


मुंबई : आता राज्यातील रेशन कार्डधारक कुटुंबांना अन्नधान्याबरोबर दरमहा 1000 रुपयांची थेट आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ही रेशन कार्ड अर्थसाह्य योजना 2025 1 जूनपासून अंमलात येणार असून, गरजू कुटुंबांना थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. यामुळे दिलासा मिळणार आहे.

हजारो कुटुंबांना थेट मदतीचा फायदा होणार आहे. कोरोनानंतरच्या आर्थिक अडचणी, महागाईचा वाढता वेग आणि बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांना केवळ मोफत रेशनच नव्हे, तर निश्चित आर्थिक आधार मिळावा, यासाठी ही योजना राबवली जात आहे. यासाठी काही अटी सरकारने घातल्या आहेत, जेणेकरून गरजूंना फायदा मिळेल.

यामध्ये अर्जदाराचे नाव शिधापत्रिकेत असावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे 1 लाखापेक्षा कमी. महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक. लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी संलग्न असावे. यासाठी शिधापत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे.

यासाठी mahafood.gov.in किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ‘रेशन कार्ड नवीन योजना 2025’ या पर्यायावर क्लिक करा. रेशन कार्ड क्रमांक व इतर आवश्यक माहिती भरा. सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. फॉर्म भरा आणि ‘Submit’ वर क्लिक करा. अशी प्रक्रिया आहे.

दरम्यान, राज्य सरकारची ही एक महत्वाची योजना आहे. ही रेशन कार्ड अर्थसाह्य योजना 2025 1 जूनपासून अंमलात येणार असून, गरजू कुटुंबांना थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. यामुळे याचा तुम्हाला फायदा होणार असून लाडकी बहीण योजनेनंतर ही योजना देखील प्रभाव टाकणार का? हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!