Gold Price : मोदी सरकारच्या निर्णयामुळे सोन्याची मागणी वाढणार, ७५० टन विक्री होणार, जाणून घ्या….


Gold Price : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. यानंतर भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या बारवरील आयात शुल्क १५% वरून ६%, आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्क १५.४% वरून ६% पर्यंत कमी झाले आहे.

तसेच वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पात घोषित केलेल्या शुल्क कपातीमुळे वर्ष २०२४ मध्ये सोन्याची मागणी ७५० टन होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीची मागणी वाढणे अपेक्षित आहे. नुकत्याच संपलेल्या वर्ष २४ च्या एप्रिल-जून तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी ५ टक्क्यांनी घसरून १४९.७ टन झाली आहे. एप्रिल-जून तिमाहीत भारतातील दागिन्यांची मागणी वार्षिक तुलनेत १७ टक्क्यांनी घसरून १०६.५ टन झाली. Gold Price

जैन म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येतील. यामुळे तिस-या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) आणि चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, २०२३ मध्ये, भारतातील सोन्याची मागणी घसरून ७४५.७ टन होती. मागणीतील ही घसरण, चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. यामागचे कारण म्हणजे सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!