चुकीच्या दिशेने जाणे बेतले जीवावर, कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर अपघातात पाच जण ठार


मिरज : मिरजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजेजवळ बायपासवर जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली आहे. यामध्ये पाच जण ठार झाले आहेत.

राँग साईडने जाणा-या विटांनी भरलेल्या ट्रॅक्टर आणि जीपची समोरासमोर धडक झाली. यामुळे पाच जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. राधानगरी तालुक्यामधील सातजण जीपमधून सोलापूरकडे जात होते.

मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने विटांनी भरलेले ट्रॅक्टर येत होते. त्यावेळी त्यांची जीप आणि टॅक्टर यांची समोरासमोर घडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरो थेट ट्रॅक्टरमध्ये घुसली.

दरम्यान, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहेत. मिरजजवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!