मोठी बातमी! पालघरमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार, एका पोलिसासह ४ जणांचा मृत्यू, देशात खळबळ..

मुंबई : दहिसर ते मीरा रोड दरम्यान जयपूर मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये अंदाधूंद गोळीबार झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची माहिती आहे. यामुळे आता याबाबत चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, जयपूर-मुंबई चालू ट्रेनमध्ये एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एका वादामुळे एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ASI शिवाय ३ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेतला आहेत.
सध्या पोलीस रेल्वेतील प्रवाशांचे जबाब नोंदवत आहेत. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला? यामागचा हेतू काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.