स्मार्ट बोगदा! आग लागली, तापमान 60 अंशावर पोहोचले तरी होणार पाण्याचा शिडकाव, बोगद्यात फोन अन् ऑक्सिजन…


मुंबई : सध्या राज्यात रोडची अनेक कामे सुरू आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्या नागपूर ते मुंबई या समृद्धी एक्सप्रेसवेचा शेवटचा भाग आणि देशातील पहिला स्मार्ट बोगदा लोकांसाठी उघड झाला आहे. या एक्सप्रेसवेचा शेवटचा भाग म्हणजे ७६ किमी लांब नवीन रस्ता आहे. यामध्ये मोठी आधुनिकता केली आहे.

यामध्ये कसारा घाट येथे बांधलेला ८ किमी लांब देशातील चौथा सर्वात लांब बोगदा आहे. हा बोगदा खास आहे कारण तो पूर्णपणे पर्वत कट करून बनवण्यात आला आहे. यामध्ये अनेक नवीन उपकरणे तसेच आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात असलेली अग्निशमन यंत्रणा विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

या बोगद्यात तापमान ६० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचताच स्वयंचलितपणे पाण्याचा उच्च दाबाने धुका सोडण्याचा प्रकल्प सक्रिय होतो. यामुळे आग लगेच विझवली जाते. हा बोगदा म्हणजे एक अत्याधुनिक अभियांत्रिकी चमत्कार आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

यामध्ये फोन बसविण्यात आले आहेत. बोगद्यात २६ फायर अलार्म सिस्टम बसवलेल्या आहेत ज्यामुळे आग लागल्यास त्वरित अलार्म वाजेल. कंट्रोल सिस्टीम, रेडिओ कम्युनिकेशन तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील आहेत, यामुळे कसलीही अडचण येणार नाही. यामुळे प्रवास सुखकर होणार आहे.

याठिकाणी सुरक्षा आणि वाहतुकीचे निरीक्षण सातत्याने करता येते. यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित केली जाते. बोगद्यात विशेष ऑक्सिजन पुरवठ्याचीही सोय करण्यात आली आहे. बोगद्यात मोबाइल नेटवर्क व इंटरनेट सेवा देखील सुरळीत चालेल, त्यामुळे प्रवाशांना तात्काळ संपर्क साधता येईल.

दरम्यान, या बोगद्याचा उपयोग करून वाहतुकीसाठी फक्त ७ मिनिटे लागतील, जे पूर्वीच्या तुलनेत खूप वेळ वाचवेल. यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून हा बोगदा बांधला आहे. बोगद्याचा उपयोग करून वाहतुकीसाठी फक्त ७ मिनिटे लागतील. कसारा घाट बोगदा बांधण्यासाठी सुमारे २३,००० टन सिमेंट आणि ४०० टन स्टील वापरण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!