शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी ससंघटना आक्रमक!! मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, राजू शेट्टी म्हणाले…


हातकंणगले : राज्यात कर्जमाफीवरून शेतकरी ससंघटना आक्रमक झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्जमाफ करू असे जाहीरनाम्यात सांगितले होते. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही, अशी वल्गना करून शेतकऱ्यांची फसवणूक केली.

यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मजले ता. हातकंणगले येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.राज्याचे मुख्यमंत्री आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपवून कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

यावेळी सांगली-कोल्हापूर महामार्गावर मजले येथील स्टार पेट्रोलपंपा शेजारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. राज्यात दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. विधानसभा निवडणुका संपून जवळपास ८ महिने झाले तरीही सरकारकडून कर्जमाफीबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले. अवकाळी पाऊस , दुष्काळ, वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपुर्ण कर्जमाफी करावे अन्यथा संपुर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे करणार असल्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!