फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता जात प्रमाणपत्रासाठी पळापळ थांबणार? एका क्लिकवर होणार उपलब्ध, जाणून घ्या…


मुंबई : फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांचा फायदा होणार आहे. जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे फेरे मारणाऱ्या लाखो अर्जदारांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. आता ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे.

यामुळे आता एका क्लिकवर प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. ही प्रणाली लवकरच राबवली जाणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. याबाबत सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच पुढील १०० दिवसांत कृती आराखडा तयार करण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे हे काम आता लवकर होणार आहे.

याबाबत माहिती अशी की आता ही प्रणाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित होणार आहे. आता पेपर आधारित प्रक्रियेत वेळ व श्रम वाया जातात. त्यामुळे ही संगणकीकृत प्रणाली लाखो अर्जदारांसाठी फायद्याची ठरणार आहे.

दरम्यान, सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश, निवडणूक आरक्षण, तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय यांना जात प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र त्यांची मोठी पळापळ होत असल्याचे अनेकदा आपल्याला दिसून येते.

यामध्ये आता अर्जदारांना अर्ज करताना मार्गदर्शन करणारा नियमाधारित इंटरफेस उपलब्ध असणार आहे. तसेच अर्जदाराचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आधार कार्डातील पत्ता ही माहिती प्रणाली स्वतःच पडताळणार. तसेच आवश्यक कागदपत्रे डिजीलॉकरमधून थेट पडताळली जातील, असेही सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!