Eknath Shinde : सुरतला जाताना चहा पिण्यासाठी थांबलो तेव्हा उद्धव ठाकरे यांनी फोन केला अन्…! एकनाथ शिंदे यांचा सर्वांत मोठा खुलासा…


Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतमध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता आणि मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे. शिवाय ठाकरेंनी भाजपशी देखील बोलणी सुरु केली होती, असं ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, असा एकही दिवस नव्हता जेव्हा माझा अपमान व्हायचा नाही. हा कोणता कट नव्हता कर उठाव होता. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीच तो सुरु झाला होता. मी माझ्या आमदारांना संजय राऊतांना मतदान करण्यास सांगितलं होतं.

त्यांचा पराभव करु शकलो असतो पण केला नाही. त्यानंतर आम्ही सुरतला निघालो. आम्ही सुरतकडे निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा मला अनेकदा फोन आला, असं शिंदे यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, मी वसईमध्ये असताना एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो. यावेळी उद्धव ठाकरेंचा फोन आला. मला त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. पण, मी त्यांना म्हंटले आता खूप उशिर झाला आहे. Eknath Shinde

याशिवाय उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांना फोन केले. त्यांना सांगण्यात आलं की आपण युती करुया, शिंदेसोबत जाण्याची गरज नाही. पण, आता त्यांच्याकडे काही उरलं नव्हतं, असं शिंदे म्हणाले.

माझा नेहमी अपमान झाला. माझे मंत्रीपद काढून घेण्याचा प्रयत्न होता. जीवाला धोका असून देखील माझी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली नाही. त्यांना स्वत:ला आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मी त्यांना आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्यात स्पीडब्रेकर वाटत होतो. मला मुंबईमध्ये देखील लक्ष घालू दिलं नाही, असे शिंदे म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!