Eknath Shinde : एकनाथ शिंदेकडून शिवसेना नावाला कलंक, ‘या’ नेत्याचा मोठा आरोप…


Eknath Shinde : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडवट टीका केली आहे.

राऊत यांच्या मते, मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना या नावाला कलंक लावत आहेत. त्यांनी आठवले की, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा काळ असे होते, जेव्हा ते मातोश्रीवर येऊन चर्चा करत होते. राऊत म्हणाले की, आजच्या परिस्थितीत हे दृश्य उलट झाले आहे, आणि ते खूप गंमतीशीर आहे.

संजय राऊत यांनी शिंदे यांचे दिल्लीतील वास्तव्य आणि त्या काळातील घटनांची चेष्टा केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत, मात्र त्यांना काय होणार हे देखील माहित नाही. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत यांच्याकडे असलेल्या महाविकास आघाडीतील जागावाटपाविषयीचे मुद्दे देखील समोर आले आहेत. Eknath Shinde

राऊत पुढे म्हणाले की, स्वतःला शिवसेना म्हणवून घेणारे, विधानसभेच्या तोंडावर दिल्लीत जाऊन उठाबशा काढत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की, शिवसेनेने कधीही उठाबशा काढण्याचे काम केले नाही. “जागावाटपासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी आम्ही कधी दिल्लीत गेलो नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!