Eknath Shinde : मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट इशारा, म्हणाले, खालच्या पातळीवर…


Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. जरांगे थेट सागर बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील यांनी काल आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जरांगे यांची भाषा राजकीय वाटते. त्यांच्या मागण्या बदलत आहेत. जणू काही त्यांना शब्द लिहून देत आहेत. असे आरोप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने रविवारी (२५ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत आम्ही जे बोललो होतो ते आम्ही केले. काही लोक राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगे हे मराठ्यांच्या अस्सल भावनेतून लढत आहेत. सरकार मराठा समाजासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहे. जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. प्रत्येक आंदोलनात मीही त्यांना भेटायला गेलो आहे. Eknath Shinde

मात्र सध्या जरांगे यांनी केलेले खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group