छत्रपती संभाजीनगरात, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निवदांमध्ये कथीत घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी…!


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात अंमलबजावणी संचालनालयाने जोरदार कारवाई सुरु केली आहे. छत्रपती संभाजीनर शहरातील सुमारे नऊ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला आहे. कारवाईचे नेमके कारण पुढे आले नाही. मात्र, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निवदांमध्ये कथीत घोटाळा प्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. ईडीचे अधिकारी आज (ता.17) भल्या सकाळीच शहरात दाखल झाले. त्यांनी शहरातील नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत.

 

 

प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर शहरातील सीटी चौक पोलिसांमध्ये 19 जणांविरोधात या आधीच गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांवर ई-निवीदा प्रकरणी अटी आणि शर्थींचा भंग केल्याचा आरोप आहे. हा भंग म्हणजे महापालिकेची फसूवणूक असल्याचा दावा करत गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

 

अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर महापालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार होती. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. साधार 40 हजार घरांसाठी चार हजार कोटी रुपयांचे कंत्राट देण्यासंदर्भात ही निविदा होती. हे कंत्राट मिळविण्यासाठी रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या. मात्र, या सर्वच्या सर्व निविदा एकाच आयपी अँड्रेसवरुन भरल्या गेल्याचे समोर आले होते. त्यामुळे या निविदा भरताना अटी आणि शर्थिंचा भंग झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर या संदर्भातील सर्व कागदपत्रे ईडी कार्यालयाने ताब्यात घेतली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!