Devendra Fadnavis : राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवार यांचीच, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट..

Devendra Fadnavis मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले महाराष्ट्रात २०१९मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया ही शरद पवार यांचीच होती. २०१९मध्ये शिवसेनेने आम्हाला धोका दिला होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला. आम्हाला तीन पक्षाचं सरकार नकोय. आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा हा प्रस्ताव होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
पहाटेच्या शपथविधीचा क्लायमॅक्स सांगताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रपती राजवट लावण्यापूर्वी प्रत्येक पक्षाला पत्र देऊन विचारणा करण्यात येते की, तुम्ही सरकार स्थापन करत आहात का, तसेच लेटर एनसीपीलाही देण्यात आले होते.
त्याला, आम्ही सरकार बनवत नाहीत, असे उत्तर देणारे राष्ट्रवादीचे लेटर मी टाईप केले होते. माझ्याच घरी ते लेटर टाइप झाले होते. त्यामध्ये पवार साहेबांनी सांगितलेले करेक्शन करुन ते पत्र एनसीपीने दिले होते.
शरद पवार हे मोठे नेते आहेत, ते मोठ-मोठ्या गोष्टी सांगतात. पण सत्य हेच आहे की, शिवसेनेने आमच्या पाठिंत खंजीर खुपसल्यानंतर शरद पवार हेच आमच्यासोबत सरकार बनवू इच्छित होते. असे देखील फडणवीस म्हणाले आहे.