केरळमध्ये हाऊसबोट उलटून मृत्यू झालेल्यांची संख्या 21 वर, अपघाताचे कारण आले समोर…


तिरुअनंतपुरम : केरळमध्ये काल एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील
मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागात रविवारी संध्याकाळी थुवलाथिराम बीचजवळ एक हाऊसबोट उलटली.

या बुडीत अपघातातील मृतांची संख्या 21 झाली आहे. बोटीत 40 जण होते. ₹ शाळेच्या सुट्ट्यांमध्ये जलप्रवासासाठी हे सर्वजण आले होते. आतापर्यंत 21 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

चिखलात आणखी किती लोक अडकले आहेत, हे शोधण्यासाठी आम्ही शोध सुरू ठेवत आहोत. मलप्पुरमच्या ओटुमपुरम येथील थुवलाथिरम येथे रविवारी सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मृतांचा आकडाही वाढू शकतो. एक महिला आणि दहा वर्षांच्या मुलीची ओळख पटली आहे तर इतर पीडितांची ओळख अद्याप पटलेली नाही. पाणी अचानक बोटीत आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!