मुंबईत २६/११ हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात!! भाजपच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा…

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यात २६/११ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला घडू शकत नाही. मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या वक्तव्याने आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ते म्हणाले, दाभोलकर, पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी या हत्यासाखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षड्यंत्र आहे. यामुळे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सत्ता बदलली तरी पोलिस व्यवस्था बदललेली नाही. दाभोलकर हत्या प्रकरणात शिक्षा झालेले शरद कळसकर आणि सचिन अंदुरे निर्दोष आहेत.
दरम्यान, त्यांची सुटका होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. आमच्या कामाचा बारामतीच्या काकांना राग होता. फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र यापुढे पवारांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणार का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, देशात राजकीय बदल झाला तरी केवळ तेवढ्याने भागत नाही. सरकार आपले असले तरी व्यवस्था आपली नाही. पोलिस, महसूल, न्यायव्यववस्था अशा सर्व क्षेत्रांत वेगळे लोक आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे आपण यशस्वी झालो, असे नाही. व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.