Chhatrapati Sambhajinagar : राज्यात उष्णतेची लाट! उष्मघाताना एका तरुणाचा गेला बळी, राज्यात अजून उष्णता वाढणार…

Chhatrapati Sambhajinagar : राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापासूनआकाशातून आगीचा वर्षाव होत आहे. त्याचा परिणाम खाली जमिनीवर दिसून येतो. उष्णतेची लाट टाळण्यासाठी आरोग्य विभागाने यापूर्वीच सूचना दिल्या होत्या.
राज्यात उष्णतेच्या लाटेने पहिला बळी घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमान 39 अंश सेल्सियसवर पोहोचलं आहे. जिल्ह्यात उष्माघाताच पहिला बळी गेला आहे.
उष्माघाताने गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातल्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथे एका खासगी कंपनीत गणेश कुलकर्णी वय तीस वर्ष हा तरुण कामाला होता. गणेश हा जैनपूर मार्गाने बिडकीनकडे येत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस आला. Chhatrapati Sambhajinagar
यावेळी त्याला तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मात्रे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. गणेशचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.