CAA Implementation : मोठी बातमी! देशभरात आजपासून नागरिकत्व सुधारणा कायदा CAA लागू, केंद्राने नोटिफिकेशन केले जारी…

CAA Implementation : देशभरात आजपासून नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए कायदा आजपासून लागू झाला आहे. याचं नोटिफिकेशन केंद्र सरकारने काढले आहे. लोकसभा निवडणुकीचा तोंडावर मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
सीएए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झाले आहेत. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध, शिख, पारशी या धर्माच्या लोकांचा समावेश आहे.
काय आहे कायदा?
या नागरिकत्व सुधारणा कायदा कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळणार आहे, असे केंद्र
सरकारने म्हटले आहे. मात्र कॉंग्रेससह विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे. हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. CAA Implementation
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या निवडणूकांच्या भाषणांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए लागू करण्या संदर्भात वारंवार उल्लेख केला आहे. केंद्र सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांपैकी काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम ३७० हटविणे, अयोध्येत राममंदिराची उभारणी करणे या घोषणांना प्रत्यक्षात सत्यात आणून दाखविले आहे.
मात्र, नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेत ११ डिसेंबर २०१९ मध्ये पास केल्यानंतर अजूनही त्याची अमलबजावणी केलेली नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्याला मुस्लीमांना प्रचंड विरोध करून दिल्लीत उपोषण सुरु केले होते.
केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा पारीत केला होता. नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ ची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू केला जाईल असे गृहमंत्री अमित शाह यांनी भाषणात वारंवार सांगितले आहे.