ब्रेकिंग! देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वांत मोठं वक्तव्य, म्हणाले, आता पाकिस्तानने हल्ला केला तर…

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण देशाला संबोधित केले. सध्याच्या युद्धजन्य काळात सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. यामुळे मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. अजूनही पाकिस्तानकडून हल्ले केले जात आहेत. शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती केल्याच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे.
यावेळी मोदी म्हणाले, आता पाकिस्तानने हल्ला केला तर सडेतोड उत्तर देणार, आम्ही फक्त कारवाई स्थगित केली आहे. 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा आम्ही केला. पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट केले. पाकिस्तानने शाळा आणि धार्मिक स्थळांना टारगेट केलं होतं.
येणाऱ्या काळात पाकिस्तानने जर पुन्हा कारवाई केली तर काठोर निर्णय घेऊन पुन्हा सडेतोड उत्तर दिले जाईल. या लढाईत आम्ही पाकिस्तानला धूळ चारली. आपला देश एकजूट आहे हीच आपली ताकद आहे.
अनुहल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही, असेही मोदी यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत भारतीय लष्कराने पत्रकार परिषदा घेऊन ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये नेमकं कशाप्रकारे हल्ले झाले, याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे.