Breaking News : औरंगाबाद-उस्मानाबाद शहरांनंतर आता जिल्ह्यांचीही नावं बदलली, राजपत्र जारी..


Breaking News छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातली सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे औरंगाबाद शहरानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे नाव बदलले जाणार असून आता संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव हे छत्रपती संभाजीनगर करण्यात येणार आहे. याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव आता धाराशिव करण्यात येणार आहे. (Breaking News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने काल (१५ सप्टेंबर) राजपत्र प्रकाशित करुन दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलली आहेत. एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यानंतर औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव केले होते.

पंरतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचं नाव बदललेलं नव्हतं. मात्र आता राजपत्र जारी करुन त्यात बदल करण्यात आले आहेत.

शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचे नामफलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.

दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही मंत्रिमंडळ बैठक खूप महत्त्वाची आहे. या बैठकीमध्ये दुष्काळा संधर्बात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन संभाजीनगरमध्ये उपस्थित आहेत. यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरणा बरोबरच अजून कोणकोणते निर्णय या बैठकीमध्ये होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!