‘शिरुर -हवेली’त भाकरी फिरणार नाही! भाजप नेत्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ..!!


जयदीप जाधव

उरुळीकांचन : राज्यातील विधानसभा निवडणुकीला १४ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूकीपूर्व अंदाजवर्तविण्यासाठी सुरुवात झाली आहे .नुकताच ‘न्यूज ऐरीया इंडीया’ या संस्थेने निवडणूकीचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील निवडणूकपूर्व अंदाजांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या सर्व्हेत गेली ‘तीन टर्म विजयाची भाकरी भिरविणाऱ्या शिरुर – हवेली मतदारसंघात यंदा ‘भाकरी फिरणार नसल्याचा’ अंदाज या सर्व्हेत नोंदविला आहे.त्यामुळे राज्यात सत्ता येऊनही या ठिकाणी भाजपचा पराभव होणार असल्याच्या शक्यतांनी शिरुर- हवेली मतदारसंघात भाजपवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे .

कर्णाटक विधानसभेच्या निवडणूकीत तंतोतंत निकालाचा निवडणूकपूर्व अंदाज देणाऱ्या न्यूज एरिया इंडीया या संस्थेने राज्यातील जनतेच्या मूडचा सर्व्हे केला आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघाचा सर्व्हे या संस्थेने केला आहे. या सर्व्हेनुसार शिरुर-हवेली मतदारसंघाचा निवडणूक पूर्व सर्व्हे संस्थेने नोंदविला आहे. त्यानुसार हा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’ आपल्याकडे कायम ठेवील असा अंदाज व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यातील २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तयार झालेल्या शिरुर- हवेली मतदारसंघात गेली तीन टर्म झालेल्या निवडणुकीत आदलून- बदलून या मतदारसंघात संधी देण्याची किमया मतदारांनी साधली आहे. त्यानुसार २००९ ला अशोक पवार , २०१४ ला स्व. बाबुराव पाचर्णे तर पुन्हा २०१९ अशोक पवार यांना मतदारांनी संधी दिली आहे. मात्र स्व. बाबुराव पाचर्णे यांचे वर्षभरापूर्वी निधन झाल्याने या प्रतिस्पर्ध्यांत यंदा निवडणुक होणार नाही.

त्यामुळे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यापुढे आता त्यांचे पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीत एकत्र काम केलेले प्रदिप कंद प्रदिप कंद यांचे आव्हान असणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार पक्षाने त्यांना मतदारसंघात निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे २०२४ ची निवडणूक पवार विरुद्ध कंद अशी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

आगामी निवडणुकीत प्रथमच शिरुर व हवेली तालुक्यातील प्रतिस्पर्धी पक्षांचे उमेदवार दोन स्वतंत्र पक्षाकडून समोरासमोर उभे राहणार असल्याने तालुक्यातील अस्मितेचा मुद्दा उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणूकीचा सर्व्हे राष्ट्रवादीच्या बाजूने आल्याने मतदारसंघात भाकरी फिरविण्याची परंपरा मोडीत निघण्याची शक्यतांनी सत्ता येऊन भाजपच्या पराभवानी भाजपला आत्मपरिक्षण करण्याची वेळ येऊन पोहचली आहे.

दिवंगत भाजप नेते बाबुराव पाचर्णे यांनी २०१४ ते २०१९ या काळात राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्गांची मंजुरी, बायपास ,नदीजोड पुल व सिंचनाचा महत्वाच्या कामांनी विकासाचे स्ट्रक्चर उभे केलेला हा मतदारसंघ भाजपला आपल्याकडे राखण्यात अपयश येते काय ? अशी सर्व्हेतून स्थिती पुढे येत आहे.

शिरुर-हवेली मतदारसंघ हा संमिश्र कौल देतो म्हणून हा मतदारसंघ विजयाचे मनसुबे भाजपने आखले आहेत. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर सातत्याने प्रदेश नेत्यांचे या मतदारसंघात दौरे होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच या मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. स्थानिक प्रश्नांसहीत आवश्यक प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

परंतु मतदारसंघाची संघटनात्मक बांधणी , कार्यकर्त्यांशी संवाद व एकत्र बांधून ठेवण्यात अपयश येत असल्याने नेतृत्व कमी पडत असल्याची भावना आहे. त्यामुळे सर्व्हेनुसार मतदारसंघ जिंकणे स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या पश्चात भाजपसाठी जड जाणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडण्यात अपयश ?

शिरुर-हवेली मतदारसंघात विकासकामे करुन पराभव घडतो असा इच्छुकांचा होरा तयार झालेला आहे. गेल्या तीन टर्म असे चित्र मतदारसंघात आहे. त्यामुळे २०१९ च्या निकालानंतर या मतदारसंघात विकासकामांचे व मूलभूत प्रश्नांचे फारसे गांभीर्य कोणी घेतले नसल्याची स्थिती आहे.वाहतुक कोंडी,वीजसमस्या, शहर पोलिसांची दडपशाही, सिंचन आवर्तन या साध्या गोष्टींची पूर्तता होऊ शकली नाही. अशीच आवस्था सत्ता असून भाजपची आहे.

हवेली बाजार समिती वगळता फारसे काय केलं नसल्याची स्थिती आहे. यात भाजपच्या दावेदारांचा जनतेशी नसलेला संपर्क व पदाधिकाऱ्यांची हवेत घोडेश्वारी करण्याची पध्दत या कारणांनी सर्व्हेत भाजप पाठिमागे पडल्याची चर्चा आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!