मोठी बातमी! तब्बल 15 हजार पोलिसांची भरती ; मुख्यमंत्र्यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 मोठे निर्णय…

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तरुणांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिसांची भरती करण्याच्या निर्णयाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांची प्रतिक्षा अखेर आज संपली आहे.
मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस दलाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंत्रिमंडाने आणखीन 4 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय?
1. गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15 हजार पोलिस भरती करण्यास मंजुरी देणयाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला
2. अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय झाला आहे
3. विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला
4. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारित महामंडळांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.