सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! ५०० रुपयांच्या नोटाही बंद होणार?, RBI ने दिले स्पष्टिकरण

नवी दिल्ली : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवी माहिती दिली आहे. सध्या ५०० रुपयांच्या नोटा काढून टाकण्याच्या विचारात आरबीआय नसल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. तसेच 1,000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यावर लोकांनी काही नवे अंदाज बांधु नये असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
वकिलाचा पेहराव करून भर कोर्टात कुख्यात गुन्हेगारावर पिस्तुलातून गोळ्यांची बरसात
५०० रुपयांच्या नोटा बंद होणार?
याबाबत अधिक माहिती अशी की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत २००० च्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश आरबीआयने दिले.
अभिनेत्री क्रिती सेनने मंदिराबाहेर किस केल्याने पुजारी भडकले, म्हणाले हॉटेल रूममध्ये जा आणि
त्यानंतर ५००० रुपयांच्या नोटाही चलनातून बाद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच १००० रुपयांच्या बंद झालेल्या नोटा पुन्हा बाजारात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.
देशात पुन्हा उडाली खळबळ! लिव्ह-इन पार्टनरची हत्या करत मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले, आणि
२००० रुपयांच्या एकूण ३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. नोटा चलानतून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर २००० रुपयांच्या सुमारे १.८ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटांपैकी हे अंदाजे ५० टक्के आहे,” अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.
बैलाने काढला सगळ्या गावकऱ्यांचा घाम! घराच्या छतावर चढला बैल अन्..
परत आलेल्या २००० रुपयांच्या नोटांपैकी ८५ टक्के नोटा बँकेत ठेवी म्हणून परत आल्या आहेत, तर उर्वरित नोटा बदलण्यासाठी आहेत. असेही शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे.