उजनीच्या पाणीपातळीत मोठी वाढ! परिसरात तुफान पाऊस, शेतकरी समाधानी…

इंदापूर : सध्या पुणे जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे नदी नाले भरून वाहत आहेत. असे असताना राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
धरण सध्या वजा पातळीत आहे, मात्र लवकरच ते अधिक पातळीत जाणार आहे. धरणात सध्या 18000 क्युसिक वीसर्गाने पाणी जमा होत असून आजची टक्केवारी वजा 7.72 एवढी आहे. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरूच आहे. यामुळे जर असाच पाऊस सुरु राहिला तर पुढच्या दोन दिवसात धरण अधिक पातळीत येण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार आहे. सध्या पुण्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. पुण्यात पाऊस झाला की, उजनी धरण क्षेत्राला फायदा होतो, धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी हे पुणे जिल्ह्यातून येते. सध्या पुणे जिल्ह्यात सर्वच जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण भरण्यास फायदा होणार आहे.
पुणे जिल्ह्यात पडणारा पाऊस हा उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगला समजला जातो. धरणाची पाणी क्षमता ही 117 टीएमसी आहे. मागील वर्षी देखील चांगला पाऊस झाला होता. त्यामुळं धरण पूर्ण क्षमतेनं भरलं होतं. या धरण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर बागायती शेती अवलंबून आहे.
यामुळे शेतकरी समाधानी आहे. उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. या धरणाची पाणी क्षमता ही 117 टीएमसी आहे. यामुळे लवकरच हे धरण भरेल, असे जाणकारांनी सांगितले आहे. परिसरातील शेतीच्या कामाला यामुळे वेग आला आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.