विकासाच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल!! समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण…


इगतपुरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे (७६ किमी) दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आनंदात आज पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

याचबरोबर सायन-पनवेल महामार्गावरील तिसऱ्या ठाणे खाडी पुलाच्या (दक्षिण वाहिनी) देखील लोकार्पणाचा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत अजित पवार देखील उपस्थित होते.

या नवीन प्रकल्पांमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल, प्रवास वेगवान होईल. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणास चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल, अशी खात्री आहे. असे अजित पवार यांनी म्हणाले.

दरम्यान, या कामामुळे विकासाला चालना मिळणार आहे. हा एक महत्वाचा मार्ग असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग देखील उभारले आहेत. येणाऱ्या काळात देखील विकासासाठी कटिबद्ध असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!