तुकडेबंदीचे झाले वांदे, तुकडेबंदी पुन्हा कोर्टात, आता न्यायालयात दाद मागणार


पुणे : तुकडेबंदीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तुकडेबंदीला विरोध करणारी शासनाची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात नोंदणी विभाग सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. याबाबतचे आदेश 13 एप्रिलला दिले आहेत. हा निकाल नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विरोधात गेल्याने याची मंत्रालय स्तरावर गंभीर दखल घेतली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी शासनाकडे विचारणा केली होती. त्याला आता शासनाने देखील मान्यता दिली आहे. निकाल विरोधात दाद मागण्यात येणार आहे.

यामध्ये पहिले प्राधान्य या निकालास स्थगिती आदेश घेण्यासाठी असणार आहे. यामुळे आता काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!