Amit Shah : राज्यातील पहिल्याच सभेत अमित शहांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला, म्हणाले, तुमच्या चार पिढ्या आल्या तरी…


Amit Shah : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यात आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिराळा येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शहा यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडले.

आघाडीच्या सरकारने शिराळामध्ये बंद केलेली नागपूजा महायुतीचे सरकार सुरू करेल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आज अमित शहा यांची सभा पार पडली.

सांगलीतील शिराळा येथील सभेत बोलताना अमित शहा यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचाार सभेत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. आघाडीच्या सरकारने शिराळामध्ये बंद केलेली नागपूजा महायुतीचे सरकार सुरू करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. बत्तीस शिराळाची नागपंचमी पारंपरिक आणि पहिल्यासारखीच होणार आणि कायद्याच्या पालन करत नागपंचमी सुरू होईल अशी घोषणा अमित शहा यांनी केली. Amit Shah

अमित शहा यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मोदींच्या सरकारने काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. मात्र, हे संविधानातील हे कलम पुन्हा लागू व्हावे यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांची मागणी आहे.

शरद पवारांच्या चार पिढ्या आल्या तरी काश्मीरसाठी असलेले कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही असे शहा यांनी सांगितले. प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत साकार झाले. पण, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी रामल्लाचे दर्शन घेतले नाही. आपल्या व्होटबँकेसाठी त्यांनी अयोध्येला जाणे टाळले असल्याचा आरोपही शहा यांनी केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!