Ajit Pawar : लाडक्या बहिणीला विचारलं ऊस किती टन जातो, बहीण म्हणाली, ५०० ते ६०० टन, अजित पवारांनी डोक्यालाच हात लावला, नेमकं काय घडलं?


Ajit Pawar : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या गरजू महिलासांठी आणली आहे. मात्र, या योजनेचा लाभ द्राक्ष आणि ऊस बागायतदार देखील घेत आहेत.

असा किस्सा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाकड येथील एका कार्यक्रमा दरम्यान सांगितला. अजितदादांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून सभागृहातील उपस्थितांना आपलं हसू आवरणं कठीण झाले होते.

ते म्हणाले, आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आणली. खरं तर ही योजना अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी आहे. मात्र काही द्राक्ष बागायतदार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. असं जर झालेलं असेल,तर काही न बोललेलं बरं. म्हणजे बघा, परवा पण मी एका भागात होतो.

मी नाव नाही सांगणार. पण सगळीकडे असा ऊस.हिरव्यागार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता. यंदा पावसाळा पण चांगला झाला. त्या ठिकाणी अनेक महिला मला राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. Ajit Pawar

त्यावेळी मी महिलांना विचारलं, झाले का तुमचे ‘लाडक्या बहिणी’चे पैसे जमा? त्यावर त्या महिला म्हणाल्या “झाले ना दादा”. मी विचारलं, किती ऊस किती जातो तुमचा? त्यावर त्या महिलेने उत्तर दिलं, जातो..५०० ते ६०० टन, असा किस्सा अजित पवार यांनी सांगितला. हा किस्सा ऐकताच सभागृहामध्ये हशा पिकला.

दरम्यान, पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की,लाडकी बहीण योजना आणताना खरं सांगतो, खुरपण करणारी महिला असेल, धुणी भांडी करणारी महिला, झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला असेल किंवा कचरा गोळा करणारी महिला असेल अशा प्रकारच्या महिलांचा वर्ग खूप मोठा आहे. अशा महिलांना कधी कोणीच विचारात घेतलं नाही. त्याकरता आम्ही ही योजना आणली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!